मुख्य बातम्या

कवठे येमाईत ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरूर) येथील माळीवस्ती-इनामवस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवार (दि २४) सकाळी १० वाजता घडली होती. या तरुणाच्या मृतदेहाचा तब्बल ४८ तासांनंतर शोध लागला असुन तो ओढ्यात ज्या ठिकाणी पाय घसरुन पडला तिथंच खड्यात कपारीला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

 

राजेंद्र विक्रम कोळी (वय २५) असे या मयत तरुणाचे नाव असून तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. राजेंद्र विजेचे खांब उभे करण्याचे काम करत होता.पाऊस सुरु असल्यामुळे काम बंद होते. त्यामुळे त्याच्या एका साथीदारासह दोघे ओढ्याकडे आले होते. ओढ्याला पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चालू होते. राजेंद्र उडी मारत असताना घसरुन पडल्याचे त्याच्या साथीदाराने सांगितले. तो पडला तिथेच खड्ड्यात कपारीला अडकल्याने त्याचा मृतदेह तिथेच अडकून बसला होता.

 

शिरुर येथील महसूल व पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या पथंकाने स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसह रविवारी शोधमोहीम राबविली होती. मात्र शोध न लागल्याने तपास कार्य थांबविण्यात आले. मंगळवारी (दि.२६) सकाळी ओढ्याचे पाणी कमी झाले म्हणून येथील पोलीस पाटील गणेश पवार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता कपारीत मृतदेह अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

त्यांनी तात्काळ पोलिसांत माहिती कळविली. तसेच यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे पथक शोधकार्यासाठी हजर झाले होते. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शिरुरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद शिंदे, विष्णू दहिफळे यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शिरुर येथे पाठविला.

शिरुर तालुक्यात उडी मारताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडून तरुण बेपत्ता

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

12 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

17 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

18 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

18 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

18 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago