क्राईम

प्रेमविवाहाचा तीन महिन्यातच धक्कादायक शेवट…

बीडः तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन संसार थाटला असतानाच युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथे घडली आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी येथील आदेश चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमाचं रुपांतर तीन महिन्यांपूर्वी लग्नात झाले होते. पण काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले. सासू आणि पती त्रास देऊ लागले होते. याच त्रासातून स्वत:ची सुटका करण्याचा निर्णय पायलने घेतला. पती अहमदनगरला तर सासू शेळ्या चारण्यासाठी गेली होती. यावेळी पायल हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पायलचे मामा दत्तात्रय लेकुरवाळे (रा. कुसडगांव ता.जामखेड. जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंभोरा पोलीस ठाण्यात पती आदेश चौधरी, सासू अलका चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासू आणि पतीला अटक करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

24 मिनिटे ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

31 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

38 मिनिटे ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

43 मिनिटे ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

6 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

6 तास ago