शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे, पिराची वस्ती येथून एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून ५०,००० रुपयांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री. दिपक सोपान रणसिंग (वय २८), व्यवसाय शेती, रा. निमगाव दुडे, पिराची वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २१ जून २०२५ रोजी रात्री १२.०० ते ३.०० या वेळेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरील छप्पराच्या गोठ्यामधून एक काळ्या रंगाची, दिल्ली जातीची, बारीक शिंगाची, वयाने सुमारे दोन वर्षांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सदर म्हैस ही पिवळ्या दोरीमध्ये गुलाबी रंगाचे पाईप तोंडाला बांधलेली असून तिच्या नाकावर खडडा आहे. चोरीला गेलेल्या म्हशीची अंदाजे किंमत ५०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शेतकरी दिपक रणसिंग यांना २५ जून रोजी दुपारी २.५० वाजता ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार अज्ञात चोरट्याने मुददामपणे लबाडीच्या हेतूने स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ही चोरी केल्याचे सांगण्यात आले आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पो.ह.वा. जगताप यांनी गुन्हा दाखल केला असून पो.ह.वा. आगलावे हे तपास करीत आहेत. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली असून, लवकरच आरोपीचा माग काढण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…
आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…