RANJANGAON
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांची बुरुंजवाडी येथे शेतात पाणी देण्याच्या वादातून भांडणे होत दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे रावसाहेब बबन दिघे, शिवम रावसाहेब दिघे, मल्हारी बबन दिघे, सत्यम मल्हारी दिघे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील रावसाहेब दोघे व मल्हारी दोघे या सख्या भावांची बुरुंजवाडी गावच्या हद्दीत शेती असून त्यांच्या शेतातील सामाईक विहिरीतून दोघे पिकांना आळीपाळीने पाणी देत असतात, त्यांच्यात पिकांना पाणी देण्यावरुन वाद झाला, तर वादाचे रुपांतर हाणामारीत होत दोघांमध्ये जबर हाणामारी होत दोघांसह त्यांची मुले देखील जखमी झाले.
याबाबत रावसाहेब बबन दिघे व मल्हारी बबन दिघे रा. दिघेवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असल्याने पोलिसांनी रावसाहेब बबन दिघे, शिवम रावसाहेब दिघे, मल्हारी बबन दिघे, सत्यम मल्हारी दिघे यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस रासकर व संदीप जगदाळे हे करत आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…