शिरूर तालुका

भविष्यात अध्यात्म काळाची गरज; मृणालीताई पडवळ

निमगाव म्हाळुंगीतील मंदिरांत त्रिपुरारी पोर्णिमेचा दिपोत्सव

शिक्रापूर (शेरखान शेख): महिला व युवती या दुर्गा मातेचे रुप असून प्रत्येकामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवून सुसंस्कृत परिवार घडवण्याचे कार्य एक स्त्री करु शकते, मात्र त्यासाठी अध्यात्म हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती अभियान च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ॲड. मृणालीताई पडवळ यांनी केले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने त्रिपुरारीपौर्णिमा निमित्ताने श्री म्हसोबा मंदिर, मारुती मंदिर व महादेव मंदिर या ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती अभियान च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ॲड. मृणालीताई पडवळ व सरपंच सविताताई करपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन दिपोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपसरपंच कविता रणसिंग, पोलीस पाटील किरण काळे, संतोष खामकर, अजिंक्य तारू, शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे, मार्गदर्शक गणपतराव काळकुटे, प्रदीप पवार, डॉ. सचिन चव्हाण, एकनाथ लांडगे, राहुल रणसिंग, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण, सोसायटीचे माजी चेअरमन दादाभाऊ काळे, उदयोगपती विजय करपे, अश्विनीताई तागड, युवा व्याख्याते विशाल मराठे व कामिनीताई नागवडे, महेश गोसावी, किरण थोरात, वामन गव्हाणे, दशरथ नागवडे, शिवाजी चौधरी, विजय तागड, चेतन जायकर, संपत चव्हाण यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी गणपतराव काळकुटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा व्याख्याते विशाल मराठे व कामिनीताई नागवडे यांनी केले तर प्रास्ताविक अश्विनीताई तागड यांनी केले आणि शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

8 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

8 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

10 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago