क्राईम

शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. स्वाती राजेंद्र दळवी (वय ३८, रा. चांडोह, सालकरमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास सालकरमळा येथील शेतजमिनीत हा प्रकार घडला.

फिर्यादी स्वाती दळवी व त्यांची जाऊ प्रियांका दत्तात्रय दळवी या शेताजवळ उभ्या असताना आरोपी विश्वास चंद्रकांत सालकर हा ट्रॅक्टरने संबंधित जमिनीत नांगरणी करत होता. यावेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न करताच वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींसह इतरांनी घटनास्थळी येत दमदाटी केली.

दरम्यान, आवाज ऐकून फिर्यादींच्या कुटुंबातील सदस्य घटनास्थळी आले असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या गोंधळात फिर्यादींची सासू सुमन दादाभाऊ दळवी व जाऊ प्रियांका दत्तात्रय दळवी यांच्या गळ्यातील प्रत्येकी अर्धा तोळ्याचे मनीमंगळसूत्र तुटून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी विश्वास चंद्रकांत सालकर, जयहिंद चंद्रकांत सालकर, स्वप्नील सूर्यभान सालकर, संजय बाळू सालकर, राजेंद्र बाळू सालकर, मंदाबाई चंद्रकांत सालकर, प्रिती जयहिंद सालकर, चंद्रकांत सखाराम सालकर व अविनाश सूर्यभान सालकर (सर्व रा. चांडोह, सालकरमळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाद नेमका कशामुळे चिघळला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

3 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

5 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

5 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

6 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

6 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

10 तास ago