१५ जण जखमी, ४ वाहतूक पोलीसही बाधित
सांगली: कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं. मात्र पुढच्याच क्षणी मृत्यू समोर येईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. सांगली शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं.
सांगली शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गणपती मंदिर ते टिळक चौक परिसरात एका मद्यधुंद इनोव्हा कार चालकाने रस्त्यावर थरार माजवला. या चालकाने गाडीवरील ताबा गमावत रस्त्याने जाणाऱ्या १४ ते १५ नागरिकांना जोरदार चिरडले. या अपघातात ४ वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इनोव्हा चालक प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता. गणपती पेठेतून टिळक चौकाकडे भरधाव वेगात जात असताना त्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांना एकामागून एक धडक दिली. चालकाची गाडी वेडीवाकडी धावत असल्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ देखील समोर आला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नागरिकांचा संताप अनावर
हा थरार डोळ्यादेखत पाहिल्यानंतर परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी पाहून संतप्त जमावाने इनोव्हा कार अडवली. जमावाने कारची जोरदार तोडफोड केली, तसेच मद्यधुंद चालकाला गाडीबाहेर काढून बेडम चोप दिला. जमावाच्या मारहाणीत चालकही गंभीर जखमी झाला असून, त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींमध्ये ४ वाहतूक पोलिसांचा समावेश असल्याने पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. सध्या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आरोपी चालकावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मद्यधुंद वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…