तापमान वाढलं की, शरीरात पाणी कमी होत असल्यानं पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होणं कॉमन आहे. खासकरून जुलाब आणि अपचनासारख्या समस्या अधिक होतात. तुम्हाला सुद्धा या समस्या नेहमीच होत असतील तर यावर एक आयुर्वेदिक उपाय आहे.
काय आहे घरगुती उपाय
एक चमचा दह्यात ४ ते ५ कढीपत्ते आणि चिमुटभर हळद टाका. तुम्हाला हे मिश्रण फोडणी न देता असंच खायचं आहे. दिवसातून एकदा दुपारी हा उपाय करावा. यानं तुम्हाला लगेच आराम मिळेल. ४ ते ५ दिवस हा उपाय करा. पोटात गडबड होण्याची समस्या लगेच दूर होईल.
कसा मिळतो फायदा
दही, हळद आणि कढीपत्ते पोटासाठी खूप फायदेशीर असतात. दह्यात लॅक्टोबॅसिलस आणि बिफीडो बॅक्टेरिया सारखे प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढतात.
कढीपत्त्यांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि पचन सुधारणारे गुण असतात. यानं आतड्या साफ होतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. तसेच हळदीमध्ये नॅचरल अॅंटी-सेप्टिक गुण असतात, जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. अशात तिन्ही गोष्टींचं मिश्रण पोटातील उष्णता, जळजळ कमी करण्यास मदत करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…