तापमान वाढलं की, शरीरात पाणी कमी होत असल्यानं पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होणं कॉमन आहे. खासकरून जुलाब आणि अपचनासारख्या समस्या अधिक होतात. तुम्हाला सुद्धा या समस्या नेहमीच होत असतील तर यावर एक आयुर्वेदिक उपाय आहे.
काय आहे घरगुती उपाय
एक चमचा दह्यात ४ ते ५ कढीपत्ते आणि चिमुटभर हळद टाका. तुम्हाला हे मिश्रण फोडणी न देता असंच खायचं आहे. दिवसातून एकदा दुपारी हा उपाय करावा. यानं तुम्हाला लगेच आराम मिळेल. ४ ते ५ दिवस हा उपाय करा. पोटात गडबड होण्याची समस्या लगेच दूर होईल.
कसा मिळतो फायदा
दही, हळद आणि कढीपत्ते पोटासाठी खूप फायदेशीर असतात. दह्यात लॅक्टोबॅसिलस आणि बिफीडो बॅक्टेरिया सारखे प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढतात.
कढीपत्त्यांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि पचन सुधारणारे गुण असतात. यानं आतड्या साफ होतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. तसेच हळदीमध्ये नॅचरल अॅंटी-सेप्टिक गुण असतात, जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. अशात तिन्ही गोष्टींचं मिश्रण पोटातील उष्णता, जळजळ कमी करण्यास मदत करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…
दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…