द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीकडून कार मालकावर गुन्हा दाखल
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघाता दरम्यान एका कार मालकाने पोलिसांच्या तपासामध्ये चक्क बनावट इन्सुरन्सव कागदपत्रे जोडल्याचा प्रकार समोर आलेला असल्याने इन्सुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव दशरथ पाचुंदकर या कार मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन वर्षांपूर्वी एम एच १२ डी जि ०२६३ व एम एच १२ एल आर ५७२७ या दोन वाहनांचा अपघात झालेला होता, यावेळी एम एच १२ डी जि ०२६३ या कारचे मालक असलेले साहेबराव पाचुंदकर यांनी त्यांच्या वाहनाचे द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीचे इन्सुरन्स कागदपत्र पोलीस तपासात नुकसान भरपाई मिळण्यासाठी जमा केलेले असताना पोलिसांनी त्याबाबतची कार्यवाही करत न्यायालयात कागदपत्रे सादर केली त्यांनतर न्यायालयाने नुकसान भरपाईसाठी द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीकडे कागदपत्रे सादर केली असता इन्सुरन्स कंपनीच्या पडताळणी मध्ये साहेबराव पाचुंदकर यांनी पोलिसांकडे सादर केलेली इन्सुरन्स कागदपत्र बनावट असल्याचे समोर आले.
त्यामुळे पाचुंदकर यांनी इन्सुरन्स कंपनीची बनावट कागदपत्र सादर करुन कंपनीची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीच्या वतीने राहुल मधुकर देवपूरकर (वय ४६) रा. नवी पेठ पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव दशरथ पाचुंदकर रा. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) जि. पुणे या इसमावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…