शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळवस्तीमध्ये जमिनीच्या वादातून मुलमुले कुटुंबावर दहशतीचा हल्ला झाला. लोखंडी रॉड, फावडे व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ व जीव मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा १४ जणांसह इतर सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिदास देविदास मुलमुले (वय 45, धंदा शेती, रा. हिलाळमळा, कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली.दि. २१ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय घरासमोर असताना आरोपींनी एकत्रितपणे हल्ला केला. जमिनीच्या गट नंबर 1631/1 च्या वादावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, धमक्या देत कुटुंबातील सर्व सदस्यांना मारहाण केली.फिर्यादींना समीर शिंदे व मंगल शिंदे यांनी लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण केली.
वडील देविदास यदु मुलमुले यांना दत्तात्रय शिंदे व संदिप शिंदे यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर व छातीवर वार केला.मुलगा सूरज, पुतण्या संग्राम, पत्नी संगिता तसेच भाऊ संतोष, वहिनी प्रमिला यांनाही आरोपींनी गंभीर मारहाण केली.महिलांना केस धरून ओढणे, जमिनीवर पाडणे व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादींनी केला आहे.समीर देवराम शिंदे, संदिप दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय विठोबा शिंदे, विनायक विठोबा शिंदे, देवराम विठोबा शिंदे, धुरपाबाई देवराम शिंदे, शोभा विनायक शिंदे, सुशिला दत्तात्रय शिंदे यांच्यासह सोनाली, मनिषा, पुनम, मनिषा समीर, बाई, मंगल शिंदे व सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
जखमींना शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार करण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. अनिल आगलावे हे करत आहेत. गावात ही घटना मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जमिनीच्या वादातून वाढणाऱ्या हिंसक घटना थांबाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…