बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली.
पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
सविस्तर असे की, कर्नाटकातील चलकेरे येथील ताज अ. रहमान (वय २३) हे अकिब अरमान रहेमतुल्ला, शेख इब्राहिम अब्दुल कादीर आणि जुबेर अहमद जाफर या सहकाऱ्यांसह के.ए. ११ ए २८६२ क्रमांकाच्या कारने ६ ऑगस्ट रोजी मलकापूरकडे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते.
दरम्यान, चिखली-बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. वाहनाची कागदपत्रे मागवून कारवाई टाळण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली. यानुसार पेटीएमद्वारे चहावाल्याकडे १५०० रुपये दिल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली. यानंतर काही अंतरावर आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करत पुन्हा त्यांचे वाहन अडवले.
वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ते क्युआर कोडद्वारे भरण्याचे सांगण्यात आले. ताज रहमान यांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहनासह निघून जाण्याचा प्रयत्न केला. ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले, मात्र लगेच वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात झाला, दिलेल्या तक्रारीनुसार, चिखली पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल टेकाळे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल भंडारी यांनी १५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने चहा विक्रेत्याच्या खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर महामार्ग पोलिस मदत केंद्रातील काळूसे, आंधळे आणि किरके यांनी दोन लाखांची खंडणी मागितली व नंतर ती रक्कम ५० हजार रुपयांवर तडजोड केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.
हे आहे आरोपी कर्मचारी
पोलिस हवालदार गजानन भंडारी (जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलडाणा), पोलिस शिपाई अभय टेकाळे (चिखली पोलिस स्टेशन), या दोघांसह महामार्ग पोलिस मदत केंद्र मलकापूर येथील पोलिस हवालदार विठ्ठल काळुसे, शिपाई संदीप किरके व शिपाई विजय आंधळे या खंडणीखोर पोलिसांना पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…
मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…
अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…
आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…