बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली.
पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
सविस्तर असे की, कर्नाटकातील चलकेरे येथील ताज अ. रहमान (वय २३) हे अकिब अरमान रहेमतुल्ला, शेख इब्राहिम अब्दुल कादीर आणि जुबेर अहमद जाफर या सहकाऱ्यांसह के.ए. ११ ए २८६२ क्रमांकाच्या कारने ६ ऑगस्ट रोजी मलकापूरकडे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते.
दरम्यान, चिखली-बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. वाहनाची कागदपत्रे मागवून कारवाई टाळण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली. यानुसार पेटीएमद्वारे चहावाल्याकडे १५०० रुपये दिल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली. यानंतर काही अंतरावर आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करत पुन्हा त्यांचे वाहन अडवले.
वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ते क्युआर कोडद्वारे भरण्याचे सांगण्यात आले. ताज रहमान यांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहनासह निघून जाण्याचा प्रयत्न केला. ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले, मात्र लगेच वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात झाला, दिलेल्या तक्रारीनुसार, चिखली पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल टेकाळे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल भंडारी यांनी १५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने चहा विक्रेत्याच्या खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर महामार्ग पोलिस मदत केंद्रातील काळूसे, आंधळे आणि किरके यांनी दोन लाखांची खंडणी मागितली व नंतर ती रक्कम ५० हजार रुपयांवर तडजोड केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.
हे आहे आरोपी कर्मचारी
पोलिस हवालदार गजानन भंडारी (जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलडाणा), पोलिस शिपाई अभय टेकाळे (चिखली पोलिस स्टेशन), या दोघांसह महामार्ग पोलिस मदत केंद्र मलकापूर येथील पोलिस हवालदार विठ्ठल काळुसे, शिपाई संदीप किरके व शिपाई विजय आंधळे या खंडणीखोर पोलिसांना पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…