आरोग्य

चहा- कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी-दुपारी की संध्याकाळी

एक गरम चाय की प्याली हो

चहा म्हटलं की, अनेकांच प्रेमच. हल्ली चहाचे देखील अनेक प्रकार पाहायला मिळतात. गुळाचा, साखरेचा, आल्याचा… आपल्यापैकी अनेकजण सकाळच्या दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने करतात.

सकाळचा चहा म्हणजे दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवणं. आळस, झोप किंवा कंटाळा आला की आपल्या जिभेवर चहाची चव रेंगाळू लागते.

अनेकांना दिवसभरात चहाच आणि तर कॉफी देखील प्यायल्या आवडते.

दिवसभरात इतके वेळा चहा-कॉफी पितात की, अनेक आजार ओढावून घेतात. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात ॲसिड रिफ्लेक्स होते. यामुळे ॲसिडीटीची समस्या वाढू शकते.पण आपण कधी विचार केला आहे का? चहा आणि कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? चहा आणि कॉफी योग्य वेळी प्यायल्याने आरोग्याला फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायले तर… 

1) रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात आम्ल तयार होते. ज्यामुळे आम्लपित्त आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

2) सकाळी लवकर कॅफिनचे सेवन केल्याने शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

3) सकाळी शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी जास्त असते. जी शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. चहा आणि कॉफी प्यायल्याने कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होऊ लागते.

4) सकाळी रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन केल्याने हाडे कमकुवत होतात. तसेच मेंदूवर थेट परिणाम होतो.

5) रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने छातीत जळजळ होते.

चहा- कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती

सकाळी उठल्यावर सर्वात आधी ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. हे शरीराला डिटॉक्स करायला आणि पचनसंस्था सक्रिय करायला मदत करते. नाश्ता केल्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनी चहा किंवा कॉफी प्या. यामुळे पोटावर जास्त दबाव पडणार नाही. तसेच पचनसंस्था निरोगी राहिल. जर आपल्याला काम करताना चहा-कॉफी प्यायची असेल किंवा झोप उडवायची असेल तर सकाळी ९ ते ११ दरम्यान आपण चहा पिऊ शकतो. यावेळी शरीरातील कोर्टिसोलची पातळी सामन्य होण्यास सुरुवात होते.

या गोष्टी लक्षात ठेवा. 

1) ॲसिडीटी टाळण्यासाठी चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करा.

2) चहा आणि कॉफीमध्ये जास्त साखर घालणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. शक्य असल्यास साखरेशिवाय चहा आणि कॉफी प्या.

3) सकाळी दुधाचा चहा प्यायल्याने पोट जड वाटते. त्यासाठी हर्बल टी, लिंबू पाणी किंवा ब्लॅक टी प्या.

4) दिवसभरात २ ते ३ कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका. झोपेवर परिणाम होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

8 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

13 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

13 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

13 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

13 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

15 तास ago