क्राईम

कोळगाव डोळसच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन घेऊन जाऊन शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील येथील यशवंत कारंडे व बाजीराव सोनवणे या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ऊसाचे पिक घेतलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातील आशिष साठे व नवनाथ झेंडे यांनी त्यांच्या शेतात येऊन पिकाची पाहणी करुन आम्ही सदर ऊस विकत घेत असल्याचे सांगून यशवंत कारंडे यांचा 53 टन 1 लाख 40 हजार रुपयांना तर बाजीराव सोनवणे यांचा 34 टन ऊस 1 लाख 10 हजार रुपयांना विकत घेतला.

मात्र 6 महिने उलटून देखील दोघांना पैसे दिले नाही व पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने याबाबत यशवंत सखाराम कारंडे (वय २५) रा. कोळगाव डोळस (ता. शिरुर) जि. पुणे व बाजीराव सोनवणे (वय ४८) रा. निर्वी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिल्या असल्याने शिरुर पोलिसांनी आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे दोघे रा. चिखली ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago