क्राईम

जांबुतमध्ये फोडले कपडयाचे दुकान अन…

बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील गावठाणातील महेंद्र जाधव यांचे रामकृष्ण हरी वस्त्र भांडार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागच्या बाजूने पत्रा व प्लायवूड तोडून फोडले आहे.

दुकानात प्रवेश न करता बाहेरुनच किरकोळ कपडे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. रात्रगस्त सुरु असतानाही चोरटे घाबरत नसल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपुर्वी पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली असताना पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटे पोलिसांच्या सतर्कतेमुळे गाडी सोडून पळून गेले होते.

बेट भागात पक्के बांधकाम न करता चहूबाजूने पत्र्याची मांडणी करुन अनेक प्रकारची मोठी दुकाने थाटली आहे. त्यात लाखो रुपयांचा माल ते ठेवत आहे. बाजूचा पत्रा उचकटून अनेक चोरीच्या घटना घडत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातूनही ही अतिशय चुकीची बाब आहे. नुसते पोलिसांवर अवलंबुन न राहता आपली दुकाने सीसीटीव्ही कॅमेरे व पक्क बांधकाम असणाऱ्या ठिकाणी सुरु करणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

5 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

5 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

5 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

16 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago