क्राईम

मुंबई हादरली! ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, ८ मुलींचा समावेश, पोलिसांचा हाय अलर्ट

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता झाल्याने मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे शहरात मानवी तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोणकोणत्या भागातून मुले बेपत्ता?

शिवाजीनगर – ४

साकीनाका – २

अँटॉप हिल – २

ओशिवरा – १

मानखुर्द – १

बांगूर नगर – १

घाटकोपर – १

आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथके नेमली असून, शहरभर शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

शोधमोहीम तीव्र

गजबजलेल्या बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, सार्वजनिक उद्याने, रुग्णालये, बालगृहे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत बेपत्ता मुलांची वाढती संख्या

गेल्या काही महिन्यांत मुंबईत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत एकूण १४५ मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी ९३ मुली आहेत.

१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीतच ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यामध्ये

१८ वर्षांखालील ४१ मुली

१३ मुले यांचा समावेश आहे.

महिन्यानुसार बेपत्ता मुलांची संख्या

जून: २६ मुली

जुलै: २५ मुले (१५ मुले, १० मुली)

ऑगस्ट: १९ मुले (५ मुले, १४ मुली)

सप्टेंबर: २१ मुले (६ मुले, १५ मुली)

ऑक्टोबर: १९ मुले (१२ मुले, ७ मुली)

नोव्हेंबर: २४ मुले (९ मुले, १५ मुली)

डिसेंबर: ११ मुले (५ मुले, ६ मुली)

मुंबईसारख्या महानगरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मुलांचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

9 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

14 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

14 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

14 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

14 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

16 तास ago