क्राईम

मुंबई हादरली! ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, ८ मुलींचा समावेश, पोलिसांचा हाय अलर्ट

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता झाल्याने मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे शहरात मानवी तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोणकोणत्या भागातून मुले बेपत्ता?

शिवाजीनगर – ४

साकीनाका – २

अँटॉप हिल – २

ओशिवरा – १

मानखुर्द – १

बांगूर नगर – १

घाटकोपर – १

आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथके नेमली असून, शहरभर शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

शोधमोहीम तीव्र

गजबजलेल्या बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, सार्वजनिक उद्याने, रुग्णालये, बालगृहे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत बेपत्ता मुलांची वाढती संख्या

गेल्या काही महिन्यांत मुंबईत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत एकूण १४५ मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी ९३ मुली आहेत.

१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीतच ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यामध्ये

१८ वर्षांखालील ४१ मुली

१३ मुले यांचा समावेश आहे.

महिन्यानुसार बेपत्ता मुलांची संख्या

जून: २६ मुली

जुलै: २५ मुले (१५ मुले, १० मुली)

ऑगस्ट: १९ मुले (५ मुले, १४ मुली)

सप्टेंबर: २१ मुले (६ मुले, १५ मुली)

ऑक्टोबर: १९ मुले (१२ मुले, ७ मुली)

नोव्हेंबर: २४ मुले (९ मुले, १५ मुली)

डिसेंबर: ११ मुले (५ मुले, ६ मुली)

मुंबईसारख्या महानगरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मुलांचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

9 मिनिटे ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

22 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

22 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

22 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

22 तास ago

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…

22 तास ago