क्राईम

मुंबई हादरली! ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, ८ मुलींचा समावेश, पोलिसांचा हाय अलर्ट

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता झाल्याने मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे शहरात मानवी तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोणकोणत्या भागातून मुले बेपत्ता?

शिवाजीनगर – ४

साकीनाका – २

अँटॉप हिल – २

ओशिवरा – १

मानखुर्द – १

बांगूर नगर – १

घाटकोपर – १

आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथके नेमली असून, शहरभर शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

शोधमोहीम तीव्र

गजबजलेल्या बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, सार्वजनिक उद्याने, रुग्णालये, बालगृहे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत बेपत्ता मुलांची वाढती संख्या

गेल्या काही महिन्यांत मुंबईत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत एकूण १४५ मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी ९३ मुली आहेत.

१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीतच ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यामध्ये

१८ वर्षांखालील ४१ मुली

१३ मुले यांचा समावेश आहे.

महिन्यानुसार बेपत्ता मुलांची संख्या

जून: २६ मुली

जुलै: २५ मुले (१५ मुले, १० मुली)

ऑगस्ट: १९ मुले (५ मुले, १४ मुली)

सप्टेंबर: २१ मुले (६ मुले, १५ मुली)

ऑक्टोबर: १९ मुले (१२ मुले, ७ मुली)

नोव्हेंबर: २४ मुले (९ मुले, १५ मुली)

डिसेंबर: ११ मुले (५ मुले, ६ मुली)

मुंबईसारख्या महानगरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मुलांचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

1 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

1 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

19 तास ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

19 तास ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

19 तास ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

19 तास ago