मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर सोशल मीडियावर एक गोंधळजनक माहिती व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर या प्रकरणावर संबंधित पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सत्य परिस्थिती समोर आणली आहे.
नेमका गोंधळ कुठे झाला?
बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या ‘लिअरजेट ४५’ या खासगी विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर विमानाचं ‘मूव्हमेंट लेटर’ सोशल मीडियावर व्हायरल झालं. या कागदपत्रावर कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश अशी पायलट्सची नावे नमूद होती. हे पत्र पाहून अनेकांनी खातरजमा न करता कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो शोधून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.
पत्नीची भावूक पोस्ट: “माझे पती सुरक्षित आहेत”
कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजाम सहनी यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अफवांवर स्पष्टीकरण दिलं.“कृपया या चुकीच्या बातम्या थांबवा. कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते त्या अपघातग्रस्त विमानात नव्हते. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत,” असं भावूक आवाहन त्यांनी केलं.या पोस्टनंतर सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला.
ऐनवेळी पायलट बदलल्यामुळे झाला गैरसमज
मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणाच्या अगदी शेवटच्या क्षणी विमानाच्या वैमानिकामध्ये बदल करण्यात आला होता. मूळ नियोजनानुसार कॅप्टन साहिल मदान हे विमान चालवणार होते. मात्र ऐनवेळी ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे देण्यात आली.दुर्दैवाने, ज्या विमानाचं नेतृत्व कॅप्टन सुमित कपूर यांनी केलं, त्याच विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या दुर्घटनेतील मृतांची अधिकृत नावे
अजित पवार – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विदिप जाधव – सुरक्षा रक्षक
कॅप्टन सुमित कपूर – मुख्य वैमानिक
शांभवी पाठव – सह-वैमानिक
पिंकी माळी – फ्लाईट अटेंडंट
एकीकडे राज्याने एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असताना, दुसरीकडे सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मात्र कॅप्टन साहिल मदान यांच्या पत्नीने वेळेत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या गोंधळामागचं सत्य स्पष्ट झालं आहे.
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…