मारहाण करत दोन वाहनाच्या काचा व टायर फोडून नुकसान
शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे 2 वाहनांचा किरकोळ अपघात झाल्यानंतर चर्चा सुरु असताना दहा जणांच्या टोळक्याने काही इसमांना मारहाण करत त्यांच्या 2 वाहनांच्या काचा व टायर फोडून नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अर्जुन जाधव या युवकासह अनोळखी 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पाबळ (ता. शिरुर) येथील वक्रतुंड हॉटेल येथे विठ्ठल कामठे व त्यांचे मित्र गोरक्ष लंघे, ज्ञानेश्वर पुंडे, सयाजी मिंडे, गणेश लंघे, योगेश पवार व कानिफनाथ भोर हे सर्व त्यांच्या जवळील एम एच १४ के जे ३९९३ व एम एच १४ ई पी ३१७० या दोन कार मधून चाललेले असताना समोरुन आलेल्या एका अल्टो कारचा आरसा कामठे यांच्या कारला लागून किरकोळ अपघात झाला. त्यामुळे कामठे यांचे काही मित्र व अल्टोकार चालक चर्चा करत असताना एक व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन येथे काय करता असे म्हटला असता कामठे यांनी आमच्या कारचा अपघात झाला आम्ही चर्चा करतोय तुम्ही जा असे म्हटले त्या वेळी काही युवक तेथे आले त्यांनी कामठे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी लगेच काही युवकांना बोलावून घेतले. त्यावेळी काही युवक आले त्यांनी कामठे यांच्यासह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण केली.
यावेळी सयाजी मिंडे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व पैसे देखील पडले तर मारहाण करणाऱ्या युवकांनी कामठे यांच्या जवळील दोन्ही कारच्या काचा व टायर फोडले. दरम्यान तेथे लोकांची गर्दी होऊ लागल्याने सर्वजण निघून गेले.
याबाबत विठ्ठल दत्तू कामठे (वय ४०) रा. सविंदणे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अर्जुन जाधव रा. पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याच्या सह अनोळखी 9 युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…