क्राईम

शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून राडा

एका कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेताच्या वाटेच्या वादातून एकाच कुटुंबावर पाच जणांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव सांडस येथे घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. प्रशांत सुरेश रणदिवे (वय 34, व्यवसाय – शेती, रा. रांजणगाव सांडस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ गुलाबराव शितोळे, तानाजी बाळासो शितोळे, संभाजी दशरथ शितोळे, नंदकुमार बाळासो शितोळे व बाळासो गुलाबराव शितोळे (सर्व रा. रांजणगाव सांडस) या पाच जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रणदिवे व त्यांचे वडील शेतात जात असताना वादग्रस्त रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी रस्ता आमच्या बापाचा नाही असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी लाथाबुक्यांनी व लाकडी काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी प्रशांत यांना गुडघ्यावर, नाकावर आणि छातीवर गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांचे वडील सुरेश रणदिवे, आई सुमन रणदिवे व चुलते मधुकर रणदिवे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात रणदिवे कुटुंबातील चार जण जखमी झाले असून, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस फौजदार बनकर आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

8 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

8 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

8 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

8 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

8 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

8 तास ago