क्राईम

जावयाने सासरवाडीत जाऊन केली तिघांची हत्या…

शिर्डी : शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात जाऊन जावयाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण हत्याकांड केले. धारदार चाकूने वार केल्यामुळे सुरेशची पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित आणि आजेसासू हिराबाई यांना जीव गमवावा लागला आहे. तर सासू-सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डीीतल साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता, तर तिघांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पोलिसांनी तातडीने चार पथकं रवाना केली आणि नाकाबंदी करत पहाटेच्या वेळी नाशिकहून रेल्वेने फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम यांना अटक केली आहे.

सुरेशचा विवाह आठ वर्षांपूर्वी वर्षासोबत झाला होता, त्यांना दोन लहान मुलीही आहेत. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहातून सुरेशने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हत्याकांडामध्ये पत्नी वर्षा निकम (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25) आणि आजेसासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) यांचा मृत्यू झाला. तर सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45) आणि मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) अशी तीन जखमींची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…

लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

शिरुर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा दाखल 

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी 20 दिवस उलटूनही कारवाई नाहीच…

दिशा भोईटे हिचे निधन; मृत्युबाबत संशय; कारवाईची मागणी!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

8 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

8 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

8 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

19 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

19 तास ago