शिर्डी : शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात जाऊन जावयाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण हत्याकांड केले. धारदार चाकूने वार केल्यामुळे सुरेशची पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित आणि आजेसासू हिराबाई यांना जीव गमवावा लागला आहे. तर सासू-सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डीीतल साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता, तर तिघांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पोलिसांनी तातडीने चार पथकं रवाना केली आणि नाकाबंदी करत पहाटेच्या वेळी नाशिकहून रेल्वेने फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम यांना अटक केली आहे.
सुरेशचा विवाह आठ वर्षांपूर्वी वर्षासोबत झाला होता, त्यांना दोन लहान मुलीही आहेत. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहातून सुरेशने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हत्याकांडामध्ये पत्नी वर्षा निकम (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25) आणि आजेसासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) यांचा मृत्यू झाला. तर सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45) आणि मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) अशी तीन जखमींची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…
लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…
शिरुर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा दाखल
अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी 20 दिवस उलटूनही कारवाई नाहीच…