महाराष्ट्र

मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा आठ दिवस दर्शनासाठी बंद…

सातारा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळुबाईचे मंदिर आठ दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपूर्ण गाभारा बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीने दिली. आहे.

मांढरदेवी गडावरील काळुबाईचे मंदिर 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत भाविकांना मात्र बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना ज्यांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे ते मात्र या गडावर येऊ शकतात. मात्र, गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही, असे समितीकडून कळवण्यात आले आहे.

मांढरदेवी गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या कालावधीत भाविकांना बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. मात्र कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका आहे. राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देव दर्शनासाठी येत असतात. शाकंबरी पौर्णिमेला मांढारदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावरच्या भाविकांच्या गर्दीमुळे पूर्वी या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू यांचा मोठा सडा येथे पाहायला मिळायचा. या ओलाव्यातून घसरडे झालेल्या पायऱ्यांवरुन काही भाविक घसरले जात होते. याच कारणातून 2005 मध्ये गडावर मोठी चेंगरा-चेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 295 भाविकांचा चिरडून मृत्यू झाला होता.

देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4650 फूट टेकडी वर हे मंदिर आहे. मंदिर लहान असून त्यास सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत.

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

रांजणगाव येथे मुक्तद्वार दर्शनाला लाखों भाविकांची गर्दी

नक्की काय आहे रांजणगाव गणपतीचा इतिहास…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

10 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

10 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

11 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

11 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

11 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

11 तास ago