body
टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी भानुदास गणपत गाडगे हे आज (शुक्रवार) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास शेतातील कांदयाला पाणी देण्यासाठी गेला असताना शेतातील विहीरीत पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोह (ता. शिरूर) येथे भानुदास घाडगे यांची शेतजमिन गट नं. ५८/१/अ मध्ये तीन एकर शेत जमीन आहे. शेतामध्ये त्यांनी कांदा पिक घेतले असून आज पहाटे ५ : ३० वाजता ते शेतातील कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. ते लवकर घरी न आल्याने त्यांचा मुलगा संजय भानुदास गाडगे हा त्यांना पाहायला शेतात गेला असता त्याला शेतातील विहीरीजवळ बॅटरीची लाईट एका जागेवर दिसत असल्याने तो विहीरीवर गेला. तेव्हा त्याला त्याचे वडील दिसले नाही.
संजयने बॅटरीच्या लाईटने विहीरीमध्ये पाहीले असता त्याला वडीलांची चप्पल पाण्यामध्ये तरंगत असलेली दिसली. नंतर त्याने आजूबाजूच्या नागरिकांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. गावातील लोकांच्या मदतीने त्याने वडीलांचा विहीरीत शोध घेतला असता त्याचे वडील पाण्यामध्ये मयत अवस्थेत मिळून आले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाय घसरुन विहीरीत पडून पाण्यात बुडुन मयत झाले असावेत. त्यांच्या मरणाबाबत कोणाविरुद्ध काही एक तक्रार अथवा संशय नसल्याचा जबाब मयताचा मुलगा संजय भानुदास गाडगे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिला आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…