रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न विचारून सरकारचे लक्ष याकडे वेधून घ्यावे अशी विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदनद्वारे केली आहे.
आज (दि 17) रोजी दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमानिमित्त खंडाळे (ता. शिरुर) येथे आले होते. त्यावेळी शेखर पाचुंदकर यांनी MEPL कंपनीमुळे आसपासच्या गावातील शेती नापिक होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळावा तसेच सरकारने कंपनीला अधिकचे वाढिव क्षेत्र देऊ नये यासंदर्भात वळसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही दिले. या संदर्भात याआधीच जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र दिले असून येत्या अधिवेशनात त्या संदर्भात LAQ विचारणार असल्याचेही माजी गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे पाचुंदकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…