मुख्य बातम्या

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न विचारून सरकारचे लक्ष याकडे वेधून घ्यावे अशी विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदनद्वारे केली आहे.

आज (दि 17) रोजी दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमानिमित्त खंडाळे (ता. शिरुर) येथे आले होते. त्यावेळी शेखर पाचुंदकर यांनी MEPL कंपनीमुळे आसपासच्या गावातील शेती नापिक होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळावा तसेच सरकारने कंपनीला अधिकचे वाढिव क्षेत्र देऊ नये यासंदर्भात वळसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही दिले. या संदर्भात याआधीच जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र दिले असून येत्या अधिवेशनात त्या संदर्भात LAQ विचारणार असल्याचेही माजी गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे पाचुंदकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

49 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

3 तास ago