रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न विचारून सरकारचे लक्ष याकडे वेधून घ्यावे अशी विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदनद्वारे केली आहे.
आज (दि 17) रोजी दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमानिमित्त खंडाळे (ता. शिरुर) येथे आले होते. त्यावेळी शेखर पाचुंदकर यांनी MEPL कंपनीमुळे आसपासच्या गावातील शेती नापिक होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळावा तसेच सरकारने कंपनीला अधिकचे वाढिव क्षेत्र देऊ नये यासंदर्भात वळसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही दिले. या संदर्भात याआधीच जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र दिले असून येत्या अधिवेशनात त्या संदर्भात LAQ विचारणार असल्याचेही माजी गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे पाचुंदकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…