रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न विचारून सरकारचे लक्ष याकडे वेधून घ्यावे अशी विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदनद्वारे केली आहे.
आज (दि 17) रोजी दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमानिमित्त खंडाळे (ता. शिरुर) येथे आले होते. त्यावेळी शेखर पाचुंदकर यांनी MEPL कंपनीमुळे आसपासच्या गावातील शेती नापिक होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळावा तसेच सरकारने कंपनीला अधिकचे वाढिव क्षेत्र देऊ नये यासंदर्भात वळसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही दिले. या संदर्भात याआधीच जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र दिले असून येत्या अधिवेशनात त्या संदर्भात LAQ विचारणार असल्याचेही माजी गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे पाचुंदकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…