क्राईम

भर वर्गात गोळीबार! विद्यार्थिनीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

तरनतारन (पंजाब): पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात एका विधी महाविद्यालयात घडलेल्या थरारक घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भर वर्गात एका विद्यार्थ्याने आपल्या सहाध्यायी विद्यार्थिनीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वर्ग सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, प्रथम वर्षाची विधी शाखेची विद्यार्थिनी संदीप कौर (२०) आपल्या मैत्रिणीसोबत वर्गात बसली होती. त्याचवेळी प्रिन्स राज सिंग हा विद्यार्थी वर्गात आला. त्याने संदीपशी काही वेळ वाद घातला आणि अचानक पिस्तूल काढून तिच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच संदीप जागीच कोसळली.

घटनेनंतर काही क्षणांतच प्रिन्सने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकारामुळे वर्गातील इतर विद्यार्थी हादरले असून काहींना मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे.

एकतर्फी प्रेमातून घटना?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने विद्यार्थिनीला प्रपोज केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तिने प्रस्ताव नाकारल्याने संतापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

कुटुंबीयांचा आरोप

मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी महाविद्यालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. कॉलेजमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप करत त्यांनी जबाबदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

तपास सुरू

घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालय परिसर सील केला असून शस्त्राचा उगम, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. आरोपीकडे पिस्तूल कसे आले, ते परवानाधारक होते की बेकायदेशीर, याचाही शोध घेतला जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे राज्यात शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

18 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

18 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

18 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

20 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago