मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर वातावरण आणखी रंगतदार झाले असून ड्रामा, वाद आणि भावना यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
बुधवारच्या भागात घरात भावनिक घडामोडी घडताना दिसल्या. रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त केल्या. त्यानंतर अनुश्री आणि विशाल दोघांनीही रुचिताला समजावण्याचा प्रयत्न केला. विशालने स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी तुला कधीही सोडून जाईन. तुझ्यासोबत राहिल्यामुळे मी वीक दिसतोय.” तसेच मागील सीझनचा संदर्भ देत तो म्हणाला, “निक्कीला सपोर्ट केल्यामुळे अभिजीत जिंकला नाही.” विशालच्या या वक्तव्यामुळे घरातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, घरात आणखी एक नवा लव्ह अँगल सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. रुचिताने करणला विचारले की तन्वीचा लव्ह अँगल खोटा नव्हता, मात्र आयुषने तिला भाव दिला नाही. त्यावर करण राकेशशी बोलताना प्राजक्ताबद्दल म्हणाला, “आमच्यामध्ये केवळ मैत्री असेल, लग्न असेल… आम्ही स्वतंत्र खेळतो.” यावर राकेशने करणला सल्ला दिला, “तू तिला जप, तिच्या भावना सांभाळ.”
यानंतर करण भावूक झाल्याचे दिसले. तो प्राजक्ताला म्हणाला, “आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट झालो नाही. मला कधीच कोणाची इतकी काळजी वाटली नाही. पण तुझी काळजी वाटतेय. इथं पहिल्यांदा काहीतरी फिल झालंय. आयुष्यात काहीच नव्हतं, पण आता काहीतरी सुरू झाल्यासारखं वाटतंय.”
करणने पुढे कबूल केले की तो भावनांबद्दल बोलणं टाळत होता, कारण त्याला इमोशनल व्हायचं नव्हतं. मात्र प्राजक्ताने त्याला समजावत सांगितले, “एवढा विचार करू नकोस. बिग बॉसनंतरचं आयुष्यही महत्त्वाचं आहे. लोक सगळं लक्षात ठेवतात, आपण जज होऊ.”
या सगळ्या घडामोडींमुळे बिग बॉसच्या घरातील नात्यांची समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत चालली आहेत. पुढील भागात या नव्या लव्ह अँगलचा खेळावर काय परिणाम होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…