मनोरंजन

बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा लव्ह अँगल! करण–प्राजक्तामध्ये वाढतंय नातं, रुचिताही भावनांमध्ये गुंतली

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर वातावरण आणखी रंगतदार झाले असून ड्रामा, वाद आणि भावना यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.

बुधवारच्या भागात घरात भावनिक घडामोडी घडताना दिसल्या. रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त केल्या. त्यानंतर अनुश्री आणि विशाल दोघांनीही रुचिताला समजावण्याचा प्रयत्न केला. विशालने स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी तुला कधीही सोडून जाईन. तुझ्यासोबत राहिल्यामुळे मी वीक दिसतोय.” तसेच मागील सीझनचा संदर्भ देत तो म्हणाला, “निक्कीला सपोर्ट केल्यामुळे अभिजीत जिंकला नाही.” विशालच्या या वक्तव्यामुळे घरातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, घरात आणखी एक नवा लव्ह अँगल सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. रुचिताने करणला विचारले की तन्वीचा लव्ह अँगल खोटा नव्हता, मात्र आयुषने तिला भाव दिला नाही. त्यावर करण राकेशशी बोलताना प्राजक्ताबद्दल म्हणाला, “आमच्यामध्ये केवळ मैत्री असेल, लग्न असेल… आम्ही स्वतंत्र खेळतो.” यावर राकेशने करणला सल्ला दिला, “तू तिला जप, तिच्या भावना सांभाळ.”

यानंतर करण भावूक झाल्याचे दिसले. तो प्राजक्ताला म्हणाला, “आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट झालो नाही. मला कधीच कोणाची इतकी काळजी वाटली नाही. पण तुझी काळजी वाटतेय. इथं पहिल्यांदा काहीतरी फिल झालंय. आयुष्यात काहीच नव्हतं, पण आता काहीतरी सुरू झाल्यासारखं वाटतंय.”

करणने पुढे कबूल केले की तो भावनांबद्दल बोलणं टाळत होता, कारण त्याला इमोशनल व्हायचं नव्हतं. मात्र प्राजक्ताने त्याला समजावत सांगितले, “एवढा विचार करू नकोस. बिग बॉसनंतरचं आयुष्यही महत्त्वाचं आहे. लोक सगळं लक्षात ठेवतात, आपण जज होऊ.”

या सगळ्या घडामोडींमुळे बिग बॉसच्या घरातील नात्यांची समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत चालली आहेत. पुढील भागात या नव्या लव्ह अँगलचा खेळावर काय परिणाम होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

4 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago