जसा जसा ऋतू बदलत जातो तसा तसा त्याचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत जातो. ऋतू बदलला की त्वचेची, आरोग्याची काळजी घेण्याची पद्धतही बदलते. तसाच बदल आपल्या आहारामध्येही होतो. आता हेच पाहा ना. सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत त्वचा काेरडी पडणे, तळपायांना भेगा पडणे, अंगाला खाज येणे, केस गळणे, कोंड्याचं प्रमाण वाढणे, कॉन्स्टिपेशन असे कित्येक त्रास डोकं वर काढू लागतात. हे त्रास कमी करायचे असतील तर आहारात थोडा बदल करायला हवा त्यासाठी हिवाळ्यात सुपरफूड मानले जाणारे कोणते पदार्थ प्रत्येकानेच आवर्जून खायला हवे, याची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायलाच हवे
1) बाजरी
ऋजुता दिवेकर सांगतात की बाजरी हिवाळ्यात खायलाच हवी. भाकरी, बाजरीचा भात, लाडू अशा कोणत्याही पदार्थाच्या माध्यमातून बाजरी खाऊ शकता.
बाजरी तुमच्या हाडांसाठी, मेंदूसाठी खूप फायदेशीर असून केस गळणं कमी करण्यासाठीही बाजरीचा फायदा होतो. हिमोग्लोबिन कमी झालं असेल, एनर्जी थोडी कमी झाली असेल तरीही बाजरी तुम्हाला पुन्हा नक्कीच रिफ्रेश करू शकते.
2) उंदियाे
दुसरा पदार्थ आहे उंदियाे. गुजरातमध्ये या दिवसांत उंदियो घरोघरी करून खाल्ला जातो. वेगवेगळ्या डाळी आणि या दिवसांत मिळणाऱ्या ताज्या भाज्या यांच्या मिश्रणातून उंदियो तयार होतो
त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी उंदियो खायला हवा. हे एक उत्तम प्री- बायोटिक आहे. त्यामुळे पचन, मेटाबॉलिझम चांगले होण्यासाठीही त्याची मदत होते.
उंदियो बनवण्याची प्रोसेस
1) मुठिया तयार करा – मेथी, पीठ, मसाले मिसळून छोटे गोळे करून हलके तळून ठेवा.
2) मसाला वाटा – खोबरे, मिरची, आले, लसूण, मसाले एकत्र वाटा.
3) भाज्या कापा – सगळ्या भाज्या मध्यम आकारात कापा.
4) भाज्यांत मसाला भरा – वांगी, कांदे, केळी यामध्ये थोडा मसाला भरा.
5) कुकर / मोठ्या भांड्यात – तेल गरम करून आधी कडक भाज्या, मग बाकी भाज्या घाला.
6) मसाला + मुठिया घाला – वरून उरलेला मसाला आणि मुठिया टाका.
7) शिजवा – मंद आचेवर झाकण ठेवून वाफेत शिजू द्या. ढवळू नका.
8) शेवटी – लिंबाचा रस आणि थोडी कोथिंबीर घाला.
3) खोबरं
हिवाळ्यातलं एनर्जी बुस्टर म्हणजे सुकं खोबरं. खोबरं खाल्ल्यामुळे अंगात ताकद तर येतेच. पण त्वचा आणि केस देखील अधिक चांगले होतात. त्यांचा काेरडेपणा कमी होतो. त्यामुळे खोबऱ्याचा एक तुकडा दिवसभरातून कधीही एकदा बारीक चावून नक्की खा. दातांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होईल.
(सोशल मीडियावरून साभार)
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…