आरोग्य

हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायलाच हवे

जसा जसा ऋतू बदलत जातो तसा तसा त्याचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत जातो. ऋतू बदलला की त्वचेची, आरोग्याची काळजी घेण्याची पद्धतही बदलते. तसाच बदल आपल्या आहारामध्येही होतो. आता हेच पाहा ना. सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत त्वचा काेरडी पडणे, तळपायांना भेगा पडणे, अंगाला खाज येणे, केस गळणे, कोंड्याचं प्रमाण वाढणे, कॉन्स्टिपेशन असे कित्येक त्रास डोकं वर काढू लागतात. हे त्रास कमी करायचे असतील तर आहारात थोडा बदल करायला हवा त्यासाठी हिवाळ्यात सुपरफूड मानले जाणारे कोणते पदार्थ प्रत्येकानेच आवर्जून खायला हवे, याची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायलाच हवे

1) बाजरी

ऋजुता दिवेकर सांगतात की बाजरी हिवाळ्यात खायलाच हवी. भाकरी, बाजरीचा भात, लाडू अशा कोणत्याही पदार्थाच्या माध्यमातून बाजरी खाऊ शकता.

बाजरी तुमच्या हाडांसाठी, मेंदूसाठी खूप फायदेशीर असून केस गळणं कमी करण्यासाठीही बाजरीचा फायदा होतो. हिमोग्लोबिन कमी झालं असेल, एनर्जी थोडी कमी झाली असेल तरीही बाजरी तुम्हाला पुन्हा नक्कीच रिफ्रेश करू शकते.

2) उंदियाे

दुसरा पदार्थ आहे उंदियाे. गुजरातमध्ये या दिवसांत उंदियो घरोघरी करून खाल्ला जातो. वेगवेगळ्या डाळी आणि या दिवसांत मिळणाऱ्या ताज्या भाज्या यांच्या मिश्रणातून उंदियो तयार होतो

त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी उंदियो खायला हवा. हे एक उत्तम प्री- बायोटिक आहे. त्यामुळे पचन, मेटाबॉलिझम चांगले होण्यासाठीही त्याची मदत होते.

उंदियो बनवण्याची प्रोसेस

1) मुठिया तयार करा – मेथी, पीठ, मसाले मिसळून छोटे गोळे करून हलके तळून ठेवा.

2) मसाला वाटा – खोबरे, मिरची, आले, लसूण, मसाले एकत्र वाटा.

3) भाज्या कापा – सगळ्या भाज्या मध्यम आकारात कापा.

4) भाज्यांत मसाला भरा – वांगी, कांदे, केळी यामध्ये थोडा मसाला भरा.

5) कुकर / मोठ्या भांड्यात – तेल गरम करून आधी कडक भाज्या, मग बाकी भाज्या घाला.

6) मसाला + मुठिया घाला – वरून उरलेला मसाला आणि मुठिया टाका.

7) शिजवा – मंद आचेवर झाकण ठेवून वाफेत शिजू द्या. ढवळू नका.

8) शेवटी – लिंबाचा रस आणि थोडी कोथिंबीर घाला.

3) खोबरं

हिवाळ्यातलं एनर्जी बुस्टर म्हणजे सुकं खोबरं. खोबरं खाल्ल्यामुळे अंगात ताकद तर येतेच. पण त्वचा आणि केस देखील अधिक चांगले होतात. त्यांचा काेरडेपणा कमी होतो. त्यामुळे खोबऱ्याचा एक तुकडा दिवसभरातून कधीही एकदा बारीक चावून नक्की खा. दातांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

22 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

22 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

23 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

23 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago