क्राईम

शिरुर तालुक्यातील या गावात दुसऱ्यांदा तेच घर पडून महिला जखमी

पाच वर्षापूर्वी घर पडूनही शासनाची कुटुंबासाठी अनास्था

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे ५ वर्षापूर्वी पावसाने एक घर पडून बालकाचा मृत्यू झालेला असताना त्या कुटुंबाला अद्याप शासकीय मदत मिळालेली नसताना पुन्हा तेच घर पडून कुटुंबातील एक महिला जखमी झाली असल्याची घटना घडली असल्याने कुटुंब पुन्हा शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

केंदूर (ता. शिरुर येथील ठाकरवाडी येथे रामा रावबा गावडे यांचे घर पावसामुळे पडले असुन कुटूंबातील महिला जखमी झालेल्या आहेत. यापूर्वी पाच वर्षांपूर्वी याच कुटूंबावर घर पडून घरामध्ये एक लहान मुलगा मृत्युमुखी पडला होता तर मुलाची आई पोटावर दगड पडून जखमी झाली होती आणि मयत मुलाच्या आजीला डोक्यात मार लागला होता. त्यावेळी उद्योजक गणेश थिटे यांनी केंदूर गावचे तलाठी, ग्रामविकास अधिकारी, केंदूर ग्रामपंचायत, शिरुर नायब तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेत पंचनामा केला होता. मात्र अद्याप सदर कुटुंबाला शासनाची कोणतीही मदत मिळालेली नाही. २ दिवसात नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुन्हा पाच वर्षानंतर तोच प्रसंग गावडे कुटुंबावर दुसऱ्यांदा आलेला आहे. पुन्हा तेच घर पडून घरातील एक महिला जखमी झालेली असून सदर महिलेवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.

मात्र आदिवासी ठाकर समाजातील गावडे कुटूंब शासनाकडे पुन्हा पंचनामा करुन मदतीची अपेक्षा करत आहे. मात्र मदत नाहीच मिळाली तर पुन्हा दगड मातीत घर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामा गावडे यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या माध्यमातुन अशा गरीब कुटूंबाना पक्के घर मिळण्याची अपेक्षा देखील येथील नागरीक करत आहेत .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

5 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

5 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

5 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

5 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

5 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

5 तास ago