शिरूर तालुका

थिटेवाडी धरण दोन वर्षानंतर शंभर टक्के भरले

केंदूर ग्रामस्थांकडून आनंदाने धरणाच्या पाण्याचे पूजन

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ भागाला वरदान ठरलेले थिटेवाडी धरण २ वर्षांपासून कोरडे पडलेले असल्याने धरण भरण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असताना २ वर्षांनी सदर धरण शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांकडून पाण्याचे पूजन करण्यात आले आहे.

केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ या दुष्काळी भागातील गावासाठी थिटेवाडी धरण वरदान ठरले आहे, येथील धरणामुळे शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली आलेली आहे, या धरणात पाणी नसल्यामुळे केंदूर व पाबळ या दोन्ही गावच्या पाणी पुरवठा योजना बंद पडतात तसेच नागरिकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या देखील समस्या निर्माण होतात. मात्र गेली २ वर्षे हे धरण भरले नव्हते. मात्र तब्बल २ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येथील धरण शंभर टक्के क्षमतेने भरले.

शुक्रवार (दि. ५) रोजी संध्याकाळच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरुन धरण ओसंडन वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तर धरण पूर्ण भरल्यानंतर केंदूरचे सरपंच अविनाश साकोरे, उपसरपंच योगिता थिटे, माजी सरपंच बाबुराव साकोरे, पाणीदार प्रकल्पाचे समन्वयक भाऊसाहेब थिटे, उमेश साकोरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ताथवडे, अक्षता साकोरे, गणेश थिटे, रोहिदास गावडे, कैलास थिटे यांसह आदींनी धरणाच्या पाण्याचे पूजन केले असून धरण १०० टक्के भरल्याने येथील शेतकरी आनंदित झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

4 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

4 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

4 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

7 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

7 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

7 तास ago