शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १५ जुलै ते २१ जुलै या कालावधीत घडली असून, या प्रकरणी खोपोली येथे वास्तव्यास असलेले एकनाथ जालिंदर इचके (वय ५६) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इचके हे मूळचे इचकेवाडी (कवठे येमाई) येथील रहिवासी असून सध्या नोकरीनिमित्त खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत इचकेवाडीमधील घर बंद होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला.
घरातील कपाट फोडून १ लाख २६ हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, तसेच २५ हजारांचे चांदीचे दागिने आणि भांडी असा एकूण २ लाख २१ हजारांचा ऐवज चोरून नेला.या चोरीची माहिती मिळताच शिरुर पोलिस स्टेशन अकींत टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. सदरचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरोधात नोंदवण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
दरम्यान, गावातील बंद घरे लक्ष करून चोरटे आपली संधी साधत असल्याने नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आणि परगावी राहणाऱ्यांनी शक्यतो शेजाऱ्यांना पूर्वसूचना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…