शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १५ जुलै ते २१ जुलै या कालावधीत घडली असून, या प्रकरणी खोपोली येथे वास्तव्यास असलेले एकनाथ जालिंदर इचके (वय ५६) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इचके हे मूळचे इचकेवाडी (कवठे येमाई) येथील रहिवासी असून सध्या नोकरीनिमित्त खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत इचकेवाडीमधील घर बंद होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला.
घरातील कपाट फोडून १ लाख २६ हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, तसेच २५ हजारांचे चांदीचे दागिने आणि भांडी असा एकूण २ लाख २१ हजारांचा ऐवज चोरून नेला.या चोरीची माहिती मिळताच शिरुर पोलिस स्टेशन अकींत टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. सदरचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरोधात नोंदवण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
दरम्यान, गावातील बंद घरे लक्ष करून चोरटे आपली संधी साधत असल्याने नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आणि परगावी राहणाऱ्यांनी शक्यतो शेजाऱ्यांना पूर्वसूचना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…
मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…
राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा…