क्राईम

कोरेगाव भीमात चोरट्यांनी पळवला लाखोंचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन घरातील तब्बल 5 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथील विजया जोशी यांचे पती कामाला गेलेले असताना त्या घरात झोपलेल्या होत्या पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजारील मुलाने जोशी यांना आवाज देऊन दरवाजा उघडा का आहे, असे म्हटल्याने जोशी बाहेर आल्या असता त्यांच्या घराच्या हॉल मधील साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे आणि कपाट उघडे असल्याचे तसेच खिडकीचे गज कापल्याचे दिसले.

यावेळी त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील तेरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तीस हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल असा तब्बल 5 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे खिडकीचे गज कापून खिडकीतून हात घालत दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले.

याबाबत विजया दिलीप जोशी (वय ३७) रा. आनंदनगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. माणिकदौंडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

45 मिनिटे ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

3 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

3 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

3 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

3 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

3 तास ago