औरंगाबाद: पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे औरंगाबाद शहर हादरले असून एकाच वेळी रस्त्यावरील दोन भिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. एकाच्या डोक्यात दगड घालून तर दुसऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे नेहमीच गर्दीचे ठिकाण असणाऱ्या आणि औरंगाबादची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या बाजूला दोन्ही खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात हत्येच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत एकामागून एक असे तीन खुनाच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा एकाचवेळी दोघांची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
हत्या करण्यात आलेले दोन्ही व्यक्ती रस्त्यावर भिक मागून उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मध्यरात्री हे खून झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. तर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
औरंगाबाद शहराच्या घाटी परिसरात झालेल्या खुनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…