औरंगाबाद: पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे औरंगाबाद शहर हादरले असून एकाच वेळी रस्त्यावरील दोन भिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. एकाच्या डोक्यात दगड घालून तर दुसऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे नेहमीच गर्दीचे ठिकाण असणाऱ्या आणि औरंगाबादची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या बाजूला दोन्ही खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात हत्येच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत एकामागून एक असे तीन खुनाच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा एकाचवेळी दोघांची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
हत्या करण्यात आलेले दोन्ही व्यक्ती रस्त्यावर भिक मागून उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मध्यरात्री हे खून झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. तर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
औरंगाबाद शहराच्या घाटी परिसरात झालेल्या खुनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…
मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…
सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…
स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…
२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…
मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…