पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मगरपट्ट्यात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू
हडपसरमधील मगरपट्टा परिसरात सोसायटीच्या आवारात बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून साडेचार वर्षांच्या अनिका नवनाथ देवीकर हिचा मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
अनिका खेळत असताना अचानक घसरगुंडी कोसळून तिच्या डोक्याला, चेहऱ्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोसायटीतील घसरगुंडी व्यवस्थित बसवलेली नव्हती आणि ती काढून टाकण्याबाबत वारंवार सूचना देऊनही पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे सोसायटी अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साने पुढील तपास करत आहेत.
मद्यधुंद कारचालकाची धडक; दोन ठार, दोघे गंभीर
दरम्यान, सासवड परिसरात मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रविंद्र काकडे (वय ६५) आणि महेंद्र काकडे (वय ५३, दोघेही रा. पांगारे, ता. पुरंदर) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसऱ्या दुचाकीवरील तुकाराम पोमण (वय ६०) आणि त्यांची पत्नी सुरेखा पोमण (वय ५०, रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी कारचालक अक्षय परख (वय ३०, रा. हडपसर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काकडे यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरात सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…
मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…
मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…