शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अनधिकृत पद्धतीने बालिकेला दत्तक दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी बाल संरक्षण अधिकारी शत्रुघ्न रूस्तूम खोकले (वय ३१, रा. आळंदी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमनाथ अर्जुन पोटावळे व त्यांच्या पत्नी यशोदा सोमनाथ पोटावळे (रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर) तसेच दत्तक घेणारे बालाजी अणासाहेब जाधव व सुलभा बालाजी जाधव (रा. मांजरी बुद्रुक, पुणे) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी शिरूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज क्र. ११२/२०२३ नुसार दत्तकपत्राची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया करताना बाल न्याय अधिनियमांतर्गत आवश्यक असलेली अधिकृत व कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्णपणे पाळण्यात आलेली नव्हती. संबंधित नवजात बालिका ‘प्रिशा’ हिला कोणतीही वैधानिक परवानगी न घेता थेट दुसऱ्या कुटुंबाकडे दत्तक देण्यात आल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल तीन वर्षांनंतर उघडकीस आला असून, १३ एप्रिल २०२६ रोजी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय अधिनियम २०१५ मधील कलम ८० नुसार, अधिकृत प्रक्रिया न पाळता मुलांचे दत्तक देणे किंवा घेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करत असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे बाल दत्तक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…