पानिपत (हरियाणा): पानिपत जिल्ह्यातील इसराना गावात 15 ऑगस्ट रोजी एक आश्चर्यदायक घटना घडली आहे. ओमप्रकाश (वय ८०) यांनी एक महिना अगोदरच आपल्या मृत्यूची केलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत ठरली आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ओमप्रकाश यांनी सुमारे महिनाभरापूर्वी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ लोकांना सांगितल्याचं नातेवाईकांचे म्हणणं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ओमप्रकाश यांचा मृत्यू त्यांनी सांगितलेल्या वेळीच झाला. नऊ महिने आईच्या उदरात राहिल्यानंतर मानवाचा जन्म होतो. तसेच मृत्यूच्या नऊ महिने अगोदर अशा घटना घडू लागतात, त्यावरुन मृत्यू जवळ आल्याचे समजत असते, असे म्हटले जाते. मात्र, ही चिन्हं इतकी लहान असतात की आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
ओमप्रकाश यांचा मृत्यूचा दावा ग्रामस्थांनी विनोद म्हणून घेतला होता. पण भविष्यवाणीच्या दिवशीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न नागरिकांना आता पडला आहे. ओमप्रकाश यांचा मृत्यूबाबतचा दावा आता लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ओमप्रकाश यांना मृत्यूचा दिवस आणि वेळ माहित होती, त्यामुळे त्यांनी लोकांना शिवपुरीच्या आसपासचा परिसर अनेक दिवस आधीच स्वच्छ करण्यास सांगितले होते.
मृत ओमप्रकाश यांच्या पुतण्याने सांगितले की, ‘ओमप्रकाश हे खूप दिवसांपासून आजारी होते. पण ते जे काही बोलले ते खरं ठरेल, असे कुटुंबीयांना वाटले नव्हते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूची नेमकी वेळ आणि दिवस कसा कळणार? असा प्रश्न आम्हाला पडला होता. अनेक दिवसांपूर्वी ओमप्रकाश काका यांनी 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आपला मृत्यू होणार असल्याचे सांगितले होते आणि तेव्हा आम्ही मस्करीत घेतलेली ती गोष्ट आज खरी ठरली आहे.’
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…