देश

सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या…

नेपाळ: देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधात नेपाळमधील तरुणाईचा उद्रेक झाला होता. तरुणांच्या Gen-Z ने केलेल्या या देशव्यापी आंदोलनामुळे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी या सरकारचं प्रमुखपद सांभाळण्यास होकार दिला आहे. तसेच नेपाळचा शेजारील देश असलेला भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट करणारं मोठं विधान केलं आहे.

सुशीला कार्की म्हणाल्या की, मी नरेंद्र मोदी यांना प्रणाम करते. माझ्यावर नरेंद्र मोदी यांचा चांगला प्रभाव आहे. मी नेपाळचं नेतृ्त्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. मी कमी काळासाठी का असेना देशाचं नेतृत्व करावं, यासाठी नेपाळमधील आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या Gen-Z गटाने माझ्यावर विश्वास दर्शवला आहे, असेही कार्की यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, या आंदोलनामध्ये ज्यांनी प्राण गमावले, अशा लोकांचा सन्मान करण्यास मी प्राधान्य देणार आहे. आंदोलनादरम्यान, मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी काही तरणी करणं हे आमचं पहिलं काम असणार आहे.

यावेळी नेपाळला पाठिंबा देण्याबाबतच्या भारताच्या भूमिकेबाबत कार्की म्हणाल्या की, मी भारताचा खूप सन्मान करते. तसेच माझं भारतावर प्रेम आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित झाले आहे. भारताने नेपाळला खूप मदत केलेली आहे.

दरम्यान, नेपाळमधील अस्थिर राजकीय इतिहासाचा उल्लेख करत कार्की यांनी सांगितले की, नेपाळमध्ये सुरुवातीपासूनच काही अडचणी राहिलेल्या आहेत. सध्या परिस्थिती कठीण आहे. आम्ही नेपाळच्या विकासासाठी काम करू. आम्ही देशाची नव्याने सुरुवात करू, असेही त्या म्हणाल्या. सुशीला कार्की ह्या नेपाळच्या पहिल्या महिसा सरन्यायाधीश आहेत. त्यांनी २०१६ मध्ये हे पद सांभाळले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

14 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

14 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

14 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

16 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago