मुंबई: स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी’ ही नवी मालिका येणार असून तिचा पहिला प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
या प्रोमोमधून मालिकेतील मुख्य कलाकारांची झलक समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि लोकप्रिय अभिनेता समीर धर्माधिकारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.
‘आनंदी’ या मालिकेत अरुण नलावडे हे आनंदीच्या आजोबांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पात्राचे नाव आत्माराम जाधव असे आहे. तर समीर धर्माधिकारी हे प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज कलाकार बर्याच काळानंतर पुन्हा मालिकांच्या विश्वात पुनरागमन करत आहेत.
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना समीर धर्माधिकारी म्हणाले की, “स्टार प्रवाहसोबतची ही माझी पहिली मालिका आहे. जवळपास सात वर्षांनंतर मी पुन्हा मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मी युगंधर ही व्यक्तीरेखा साकारत आहे. काम म्हणजे त्याच्यासाठी धर्म असून गावकऱ्यांसाठी त्याचा शब्द अंतिम असतो. त्याने गावकऱ्यांना रोजगार दिल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उभे राहिले आहेत. त्यामुळे गावातील लोक त्याला देवासारखे मानतात.”
दरम्यान, अरुण नलावडे म्हणाले की, “मला मिळालेली भूमिका खूप वेगळी आहे. पालकांचे छत्र गमावलेल्या तीन नातींच्या आजोबांची भूमिका मी साकारत आहे. तिन्ही अभिनेत्रींसोबत माझी छान गट्टी जमली आहे. त्यांच्यात शिकण्याची प्रचंड धडपड आहे आणि मीही त्यांच्यासोबत शिकण्याचा प्रयत्न करत आहे.”‘आनंदी’ ही नवी मालिका ३० मार्चपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…