मनोरंजन

स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी पुन्हा मालिकेत

मुंबई: स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी’ ही नवी मालिका येणार असून तिचा पहिला प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

या प्रोमोमधून मालिकेतील मुख्य कलाकारांची झलक समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि लोकप्रिय अभिनेता समीर धर्माधिकारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.

‘आनंदी’ या मालिकेत अरुण नलावडे हे आनंदीच्या आजोबांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पात्राचे नाव आत्माराम जाधव असे आहे. तर समीर धर्माधिकारी हे प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज कलाकार बर्‍याच काळानंतर पुन्हा मालिकांच्या विश्वात पुनरागमन करत आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना समीर धर्माधिकारी म्हणाले की, “स्टार प्रवाहसोबतची ही माझी पहिली मालिका आहे. जवळपास सात वर्षांनंतर मी पुन्हा मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मी युगंधर ही व्यक्तीरेखा साकारत आहे. काम म्हणजे त्याच्यासाठी धर्म असून गावकऱ्यांसाठी त्याचा शब्द अंतिम असतो. त्याने गावकऱ्यांना रोजगार दिल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उभे राहिले आहेत. त्यामुळे गावातील लोक त्याला देवासारखे मानतात.”

दरम्यान, अरुण नलावडे म्हणाले की, “मला मिळालेली भूमिका खूप वेगळी आहे. पालकांचे छत्र गमावलेल्या तीन नातींच्या आजोबांची भूमिका मी साकारत आहे. तिन्ही अभिनेत्रींसोबत माझी छान गट्टी जमली आहे. त्यांच्यात शिकण्याची प्रचंड धडपड आहे आणि मीही त्यांच्यासोबत शिकण्याचा प्रयत्न करत आहे.”‘आनंदी’ ही नवी मालिका ३० मार्चपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

1 दिवस ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

1 दिवस ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

2 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago