मनोरंजन

‘मोहिनी’ची एन्ट्री! २३ मार्चपासून ‘कलर्स मराठी’वर नवी मालिका;

मुंबई: कलर्स मराठी वर येत्या काही दिवसांत दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून ऑन एअर होणार आहे. तर ‘मोहिनी’ या नव्या मालिकेची प्रदर्शनाची तारीख आणि वेळ वाहिनीने अधिकृतपणे जाहीर केली आहे.

“स्वाभिमान आणि अहंकाराच्या या लढाईत नेमकं कोण जिंकणार?” मोहिनी की RK? असा अनोखा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी ही मालिका मधुबाला – एक इश्क एक जुनून या लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक असल्याची चर्चा केली आहे. ही मालिका २०१२ मध्ये कलर्स टीव्ही वर प्रसारित झाली होती आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला होता.

‘मोहिनी’चा पहिला प्रोमो पाहिल्यानंतरही नेटकऱ्यांनी ही मालिका ‘मधुबाला’चा रिमेक असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांकडून या मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणती मालिका संपू शकते?

‘मोहिनी’ ही मालिका २३ मार्चपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित होणार आहे. सध्या या वेळेत जय जय स्वामी समर्थ ही मालिका दाखवली जाते. सध्या या मालिकेत स्वामी समर्थांच्या महानिर्वाणाचा भावपूर्ण अध्याय दाखवला जात असल्याने लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत वाहिनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

फ्रेश जोडी झळकणार

‘मोहिनी’ मालिकेत एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनघा ठाकूर मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे समीर घराघरांत पोहोचला होता. तसेच स्टार प्रवाह वरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

दरम्यान, मालिकेची लॉन्च डेट जाहीर होताच शर्वरी जोग, प्रतीक्षा मुणगेकर, समृद्धी केळकर, महिमा म्हात्रे, हृषिकेश शेलार आणि अभिषेक रहाळकर या कलाकारांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत ‘मोहिनी’च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

3 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

3 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

3 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

5 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

16 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

16 तास ago