मनोरंजन

व्हॅलेंटाइन स्पेशल! ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये रंगणार समर-स्वानंदीचा खास रोमँटिक सोहळा

मुंबई: १४ फेब्रुवारीला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. प्रेमाचा हा खास दिवस आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्येही रोमँटिक आणि भावनिक वळण घेऊन येणार आहे. प्रेक्षकांसाठी मालिकेत खास व्हॅलेंटाइन स्पेशल भाग सादर होणार असून अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

मालिकेत आजी अधिरावर एक खास जबाबदारी सोपवते. जसं ती स्वतः व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या तयारीत आहे, तसंच काहीतरी वेगळं आणि खास समर आणि स्वानंदीसाठीही करावं, असं ती अधिराला सांगते. आजीच्या या सूचनेनंतर अधिरा एक भन्नाट प्लॅन आखते.

या प्लॅननुसार अधिरा समर, स्वानंदी आणि रोहनला तातडीने एका ठिकाणी बोलावते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कळतं की ही एक खास व्हॅलेंटाइन पार्टी आहे. या पार्टीत समर आणि स्वानंदीचे रोमँटिक क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. प्रेम, भावना आणि नात्यांची गुंफण असलेला हा भाग नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे.

मात्र, या आनंदोत्सवात मल्लिका मात्र मिठाचा खडा टाकण्याच्या तयारीत आहे. तिचा नवा डाव काय असेल? रोहन हे सगळं शांतपणे सहन करेल का? मल्लिकाचा प्लॅन यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आगामी भाग पाहावा लागणार आहे.

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि भावनिक संवाद यामुळेच मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.व्हॅलेंटाइन डे निमित्त रंगणारा हा खास भाग नक्कीच मालिकेच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

13 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

19 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

19 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

19 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

20 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago