मुख्य बातम्या

तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात असलेली (हुंदाई आय 20) कार निमगाव फाट्याजवळ गलांडे फार्म हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना दुपारी 4 सुमारास घडली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की हि कार रस्त्यावर पासुन सुमारे शंभर फुट अंतरावर जाऊन उलटली. या अपघातात चारचाकी कारचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.

 

हा अपघात झाल्यानंतर बाजुलाच राहत असलेले संदीप भंडारे, योगीराज धुमाळ, सुखदेव ढोरे, पुरुषोत्तम घोलप, दीपक वडघुले, बाबासाहेब दौंडकर यांनी तातडीने ॲम्बुलन्सला कॉल करून उलटलेली कार सरळ केली व जखमी व्यक्तींना कारमधून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मदत केली.

 

तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर दररोज अपघाताचे सत्र सुरुच आहे. या 24 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकही गतिरोधक नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने अतिशय वेगाने चालतात. तसेच या रस्त्यावर वळणे अधिक असल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

4 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

5 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

6 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

11 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

11 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

11 तास ago