न्हावरे (तेजस फडके) करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर करड्या जवळील देशमुख वस्ती येथे शनिवार (दि २०) दुपारी ५ च्या सुमारास अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारा डंपर अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या घराला धडकला. या घटनेत घराच्या शेजारील शौचालय कोसळले. तर एक झाड आणि कांदा साठवन करणाऱ्या आरनीचेही नुकसान झाले आहे.
या अपघातात डंपर चालक जखमी झाला. घटनेनंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. सुदैवाने घरातील कोणही जखमी झाले नाही. मात्र, अपघातामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असुन सार्वजनिक बांधकाम खात्याने या अष्टविनायक महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
अष्टविनायक महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा…?
करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर १० सप्टेंबर २०२५ रोजी करडे येथुन रांजणगावकडे दोन हायवा ट्रक शेजारी शेजारी जात असताना त्यातील एक हायवा रस्त्यालगत असणाऱ्या विजेच्या खांबाला जोरात धडकला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापुर्वीही या रस्त्यावर अनेकवेळा गंभीर अपघात झालेले आहेत. त्यानंतर १० दिवसांनी २० सप्टेंबर २०२५ रोजी रांजणगाव कडुन करडेच्या दिशेने जाणारा एक डंपर घराला धडक देत थेट शेतात जाऊन थांबला. या दोन्हीही घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. त्यामुळे या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…