मुख्य बातम्या

शेतीक्षेत्र संकटात; पाण्याचा सामू (PH) असमतोल पिकांच्या उत्पादनावर घाला

मांडवगण फराटा (संपत कारकूड) शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा सामू (PH) असमतोल झाल्यामुळे पिकांच्या मुळांचे ७० ते ८०टक्के नुकसान होत असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे, अशी माहिती जलतज्ञ दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.

 

सादलगाव येथे आयोजित शेतकरी कार्यशाळेत “क्षारपड जमीन व क्षारयुक्त पाणी” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शिरुर तालुक्यातील विविध भागांतील पाण्यात क्षारांचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. पिकांसाठी आवश्यक असलेला सामू ६. ५ ते ७ इतका असावा. मात्र सध्या तो ८ ते ९ इतका आढळत आहे. त्यामुळे कितीही खते टाकली तरी जमीन त्यांचे शोषण करत नाही व ती वाया जातात. परिणामी जमिनीत क्षारपड वाढते व पिकांच्या मुळ्या सडतात.

 

यावेळी कोळेकर यांनी शेतकऱ्यांना पाणी व मातीची तपासणी करुनच खतांचे प्रमाण ठरवण्याचा सल्ला दिला. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रिय खतांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वतः तयार केलेला विशेष फॉर्म्युला वापरण्याचीही सूचना केली. या कार्यक्रमाला पुण्याचे आरोग्य सल्लागार जयवंत वाडेकर, निवृत्त सैनिक तुकाराम डफळ, तसेच सादलगाव व हंगेवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

26 मिनिटे ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

2 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

2 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

2 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

2 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

2 तास ago