मुख्य बातम्या

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरण अन् पोलिस, पत्रकार आणि खंडणी…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. ८) घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पण, आत्महत्येनंतर शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. आत्महत्येचे खरे कारण काय? याबद्दल माहिती मिळणे राहिले दूर. पण, पोलिस, पत्रकार आणि खंडणीचा विषय पुढे आल्यामुळे नागरिक आजूनच मोठ्या संभ्रमात सापडले आहेत.

अंजली गायकवाड यांनी आत्महत्या केल्यानंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती. प्रथम सुसाईड नोट गायब झाली होती. पण, नंतर ती पोलिसांना मिळाली. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांकडून काय कारवाई होते? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सुरवातीला तर हे प्रकरण दाबले जाणार? पैशापुढे कोणाचे काही चालत नाही, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. पण, सुसाईड नोट सापडल्यानंतरही काय कारवाई झाली? याचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच आहे. महिलेने कशामुळे आत्महत्या केली? कारण काय? किंवा यामागील आरोपी कोण आहे? काही कळत नसल्यामुळे या प्रकरणाची ‘सेटलमेंट’ झाली की काय? मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला. अनेकांनी हात धुवून घेतला. प्रकरण दाबले गेले, अशा चर्चा सुरू आहेत.

एखाद्या महिलेने आत्महत्येसारखे पाऊल उचलणे म्हणजेच यामागे नक्कीच मोठे कारण असू शकते. नागरिकांना समजते ते पोलिसांना का समजत नाही? एखादा साधा गुन्हा दाखल असेल तर सर्वसामान्य नागरिकावर पोलिस तत्काळ कारवाई करतात. मग, आत्महत्येसारख्या विषयावर पोलिस काहीच का करत नाहीत? याबद्दल नागरिक विविध तर्क-वितर्क लढवत आहेत.

साहेबांची दहा लाख रुपयांची ‘डिमांड’…

अंजली गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर संदीप कुटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये साहेबांनी 10 लाख रुपयांची ‘डिमांड’ केली असल्याचे म्हटले आहे. शिवाय, पत्रकारही मॅनेज करावे लागतील असे म्हटले आहे. यामुळे मूळ मुद्दा म्हणजे आरोपी राहिला बाजूला आणि पोलिस अधिकाऱ्याची ‘डिमांड’ आणि पत्रकारांच्या ‘मॅनेज’चा विषय पुढे आला आहे. यामुळे या प्रकरणात पत्रकारांची विनाकारण बदनामी करुन नक्कीच वेगळा काहीतरी डाव शिजत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago