मुख्य बातम्या

गट व ‘गन’ जाहीर होताच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येऊ लागल्या असताना शिरूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापली राजकीय ताकद दाखवण्याचे रणशिंग फुंकले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आखाडात ‘स्नेहभोजन’, ‘स्नेहमेळावा’, ‘विचारमंथन’, ‘कार्यकर्ता संवाद’ अशा नावांखाली गावागावात होणाऱ्या भव्य कार्यक्रमांमधून प्रत्यक्षात राजकीय गटबाजी, शक्तिप्रदर्शन व मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत तालुक्यातील विविध गावांमध्ये नामांकित मंगल कार्यालये, लॉन्स, आणि खुले मैदान यामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक मंडळी, वयोवृद्ध नेते, महिलावर्ग आणि युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून “हा एक स्नेहसंवाद आहे, आम्ही कोणतेही राजकारण करत नाही” असा सुर आळवला जात असला तरी या कार्यक्रमांची भव्यता, आयोजकांची उपस्थिती, वक्तृत्व आणि पार्श्वभूमी पाहता स्पष्टपणे लक्षात येते की यामागे निवडणूक तयारीचा मोठा डाव आहे. प्रत्येक भोजन सोहळा हा एकप्रकारचा गटप्रदर्शनाचा मंच झाला आहे.

या स्नेहभोजनाच्या निमित्ताने इच्छुक उमेदवार कोणत्या गटात आहेत, कोणत्या राजकीय नेत्यांच्या पाठींब्यावर उतरणार आहेत, त्यांच्या पुढे कोण ‘गन’ (म्हणजे शक्तिशाली समर्थक, नेते, किंवा संघटना) उभ्या आहेत हे उघडपणे समोर येत आहे. काही ठिकाणी माजी आमदार, माजी सरपंच, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांचाही पाठिंबा मिळवत हे इच्छुक आपली दावेदारी ठसवून सांगत आहेत.या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे मतदारांमध्ये चाचपणीचा काळ सुरू झाला आहे. कोणाचा झुकाव कुठे आहे, कोणत्या गावात कोणाचा प्रभाव आहे, कोणते सामाजिक गट कुठल्या उमेदवारासोबत आहेत याचा अंदाज उमेदवार घेऊ लागले आहेत. याचा उपयोग ते आगामी प्रचारनिती ठरवण्यासाठी करत असल्याचेही बोलले जात आहे.

सध्या निवडणूक आचारसंहिता लागू नसल्याने उमेदवार खुलेपणाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करून आखाड पार्टी देत आहे. राजकीय दृष्टिकोनातून हे कार्यक्रम कितपत परिणामकारक ठरणार हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल. सध्या मात्र शिरूर तालुका हे निवडणूकपूर्व राजकीय हालचालींचे केंद्र बनले असून प्रत्येक गावात ‘गट’ आखले जात आहेत आणि प्रत्येक इच्छुक ‘गन’सह रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

9 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

9 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

11 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago