महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! ठाकरे बंधूंच्या २ शिलेदारांनी हाती धरलं धनुष्यबाण

५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश

मुंबई: महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून, सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिसत असतानाच, शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होताना दिसतो आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती तसेच महाआघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिसत असतानाच, शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होताना दिसतो आहे. कारण ठाकरे बंधूंच्या दोन महत्त्वाच्या शिलेदारांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. अंधेरीतील झायलो सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील झायलो सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नगरसेवकांसह आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यामातून विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही धनुष्यबाण हाती घेतलंय. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाचे अधिक बळ वाढलं आहे.

यावेळी ठाकरे गटाचे माजी नगरसेविका सुनिता इलावडेकर यांनी मशालची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलंय. त्यांचा आज पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक अविनाश सावंत यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे मनसे आणि ठाकरे गटाला धक्का बसला असून, मुंबईत शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढलं आहे.

यावेळी इतर पक्षातील ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनीही शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करत पक्षाची ताकद वाढली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

शिवसेनेच्यावतीने दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी तसेच “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जनतेपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा विशेष कार्यक्रम नेस्को सेंटर, गोरेगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, खासदार रविंद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. तसेच विविध शासकीय दाखले वाटप देखील करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

9 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

10 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago