मुख्य बातम्या

महावितरणच्या माध्यमातुन विरोधकांचा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न; शेखर पाचुंदकर

शिरुर (तेजस फडके) मंचर येथील २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विजप्रवाह खंडित करुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय अशी शंका उपस्थित करत महावितरणच्या माध्यमातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी केला आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांचा प्रचार दौरा सध्या सुरु आहे. यावेळी शेखर पाचुंदकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

गणेगाव खालसा येथील पद्मावती वस्ती येथे पाचुंदकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गणेगाव येथे विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मंचर येथील २८ तारखेच्या सभेनंतर काही ठिकाणीं जाणून बुजून वीज खंडित केली जात आहे असा आम्हाला संशय आहे. तसेच वर्षातुन एकदा येणाऱ्या दिवाळी सणाची सध्या सगळीकडे धामधुम सुरु असताना सुद्धा दिवाळीचा सण हा अंधारात गेला आहे.

 

जे कर्मचारी आणि अधिकारी कालपर्यंत आमच्या विजेच्या तक्रारी ऐकून घेत होते. त्याच योग्य निराकरण करत होते. ते आज आमचा फोन सुद्धा उचलत नाहीत. त्यामुळे फक्त मंचरच्या ‘त्या’ सभेला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या सर्वसामान्य लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय का…?’ असा प्रश्न उपस्थित पाचुंदकर यांनी उपस्थित केला आहे.

 

पुढे बोलताना पाचुंदकर म्हणाले, ‘निवडणुकीचे हे १५ दिवस निघुन जातील. मात्र या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. तसेच बिबट्याच्या संदर्भात उपायोजना, दिवसा विजेसाठी उपाययोजना कराव्या लागतील. परंतु या भागात शरद पवार यांच्या माध्यमातुन चासकमानच्या कॅनॉलद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या उत्पन्नामुळे भरभराट झालेली आहे. या शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा तीव्र शब्दांत पाचुंदकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

 

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरुर तालुक्यातील ४२ गावांमधील रांजणगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा आज शनिवार (दि २) रोजी प्रचार दौरा होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आंबेगाव-शिरुर मतदार संघातील शिरुर तालुक्यातील ४२ गावांमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी शेखर पाचुंदकर, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर आणि टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामू घोडे या तिघांनी खांद्यावर घेतल्याने निकम यांची चांगलीच ताकद वाढली आहे.

कारखान्याचे कर्मचारी तुम्हाला निवडणुकीसाठी वापरायचे असल्याने तुम्ही कारखाना सुरु केला नाही

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

14 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

23 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

23 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago