शिरुर (तेजस फडके) मंचर येथील २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विजप्रवाह खंडित करुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय अशी शंका उपस्थित करत महावितरणच्या माध्यमातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी केला आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांचा प्रचार दौरा सध्या सुरु आहे. यावेळी शेखर पाचुंदकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
गणेगाव खालसा येथील पद्मावती वस्ती येथे पाचुंदकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गणेगाव येथे विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मंचर येथील २८ तारखेच्या सभेनंतर काही ठिकाणीं जाणून बुजून वीज खंडित केली जात आहे असा आम्हाला संशय आहे. तसेच वर्षातुन एकदा येणाऱ्या दिवाळी सणाची सध्या सगळीकडे धामधुम सुरु असताना सुद्धा दिवाळीचा सण हा अंधारात गेला आहे.
जे कर्मचारी आणि अधिकारी कालपर्यंत आमच्या विजेच्या तक्रारी ऐकून घेत होते. त्याच योग्य निराकरण करत होते. ते आज आमचा फोन सुद्धा उचलत नाहीत. त्यामुळे फक्त मंचरच्या ‘त्या’ सभेला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या सर्वसामान्य लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय का…?’ असा प्रश्न उपस्थित पाचुंदकर यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना पाचुंदकर म्हणाले, ‘निवडणुकीचे हे १५ दिवस निघुन जातील. मात्र या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. तसेच बिबट्याच्या संदर्भात उपायोजना, दिवसा विजेसाठी उपाययोजना कराव्या लागतील. परंतु या भागात शरद पवार यांच्या माध्यमातुन चासकमानच्या कॅनॉलद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या उत्पन्नामुळे भरभराट झालेली आहे. या शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा तीव्र शब्दांत पाचुंदकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरुर तालुक्यातील ४२ गावांमधील रांजणगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा आज शनिवार (दि २) रोजी प्रचार दौरा होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आंबेगाव-शिरुर मतदार संघातील शिरुर तालुक्यातील ४२ गावांमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी शेखर पाचुंदकर, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर आणि टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामू घोडे या तिघांनी खांद्यावर घेतल्याने निकम यांची चांगलीच ताकद वाढली आहे.
कारखान्याचे कर्मचारी तुम्हाला निवडणुकीसाठी वापरायचे असल्याने तुम्ही कारखाना सुरु केला नाही
शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण
महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…