मुख्य बातम्या

शिरुरच्या तहसिलदारपदी बालाजी सोमवंशी

नागरीकांची रखडलेली कामे मार्गी लावणार का…? 

शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरुर तहसिल कार्यालयाचा पदभार नुकताच प्रभारी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी घेतला आहे. गेले वर्षाहून अधिक काळ नागरीकांची अनेक संकलंनाची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्यातील नागरीक त्रस्त आहेत.या बाबत सडेतोड लेखनीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी केले आहे. याबाबत इतर पक्षांच्या नेत्यांबरोबरच शिरुर-हवेलीचे आमदार अँड अशोक पवार यांनी उशिरा का होईना याबाबत भूमिका स्पष्ट करुन उपोषणाचा इशारा दिला होता.

पण शिरुरला पुन्हा प्रभारीच तहसिलदार दिल्याने आमदारांची भूमिका नक्की काय राहणार आहे…? हे येत्या 30 जानेवारीनंतरच समजणारआहे. तसेच आमदार पवार यांचे शिरुरपेक्षा फक्त वाघोलीकडे जास्त लक्ष असल्याचे विरोधक सांगत आहे. यापुर्वीच्या तहसीलदार लैला शेख यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने तत्कालीन तहसिलदार यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून आजपर्यंत पुर्ण वेळ तहसिलदार शिरूरला लाभले गेले नाही.

त्यामुळे नागरीकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना बालाजी सोमवंशी यांनी चार्ज घेतला आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील जनतेला त्यांच्याकडुन कामाच्या खुप अपेक्षा आहेत. यापुर्वी त्यांनी दौंड येथे तहसिलदार असताना उत्कृष्ठ काम केले असुन दौंड वरुन पुणे कार्यालयात जिल्हा पुर्नवसन अधिकारी तहसिलदार म्हणुन चांगले कामकाज सुरु असुन त्यातच त्यांच्यावर आता शिरुरची अतिरिक्त जबाबदारी पडल्याने शिरूरला जास्तीत जास्त वेळ देवून कामाचा निपटारा करणे गरजेचे आहे.

शिरुरची जनता चांगले काम करणाऱ्या आधिकाऱ्याला डोक्यावर घेते. पण चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला जागा दाखवून देते. हे मात्र नक्की. याबाबत नवनिर्वाचित तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला असता नागरीकांच्या विविध रखडलेल्या कामांची माहीती घेवून जलद गतीने नागरीकांची कामे प्राध्यान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

8 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

9 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

13 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

1 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

1 दिवस ago