शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या बेट भागातील श्रद्धाळूंसाठी सोमवारी (दि.१८) धर्म जागरण समिती व शिवबा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पहिलीच श्री क्षेत्र टाकळी हाजी ते श्री क्षेत्र रामलिंग अशी कावड यात्रा उत्साहात पार पडली.
सकाळी सात वाजता टाकळी हाजी येथील घोडनदी तीरावर गंगा पूजन करून यात्रेची सुरुवात झाली. कावडीधारी तरुणांच्या ‘हर हर महादेव’ घोषणांनी वातावरण दुमदुमले. डोंगरगण, आमदाबाद, अण्णापूर आदी गावांतील ग्रामस्थांनी कावड यात्रेचे पूजन, फुलांची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने भव्य स्वागत केले. दुपारी दोन वाजता यात्रेचा समारोप श्री क्षेत्र रामलिंग येथे झाला.
रामलिंग देवस्थान विश्वस्त मंडळाने यात्रेतील भाविकांसाठी विशेष अभिषेक व दर्शनाची सोय केली होती. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरूर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती.या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी टाकळी हाजीसह परिसरातील उद्योजक, ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. यात्रेचे नियोजन धर्म जागरण समितीचे माऊली घोडे व शिवबा संघटनेचे सोमनाथ भाकरे यांनी केले. रामलिंग गावचे विश्वस्त नामदेव घावटे व धर्म जागरण समितीचे सचिन तागड यांनी यात्रेत सहभागी सर्व तरुण भक्तांचे आभार मानले.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…