शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात पहिल्यांदाच सुरू झालेली कावड यात्रा उत्साहात पार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या बेट भागातील श्रद्धाळूंसाठी सोमवारी (दि.१८) धर्म जागरण समिती व शिवबा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पहिलीच श्री क्षेत्र टाकळी हाजी ते श्री क्षेत्र रामलिंग अशी कावड यात्रा उत्साहात पार पडली.

सकाळी सात वाजता टाकळी हाजी येथील घोडनदी तीरावर गंगा पूजन करून यात्रेची सुरुवात झाली. कावडीधारी तरुणांच्या ‘हर हर महादेव’ घोषणांनी वातावरण दुमदुमले. डोंगरगण, आमदाबाद, अण्णापूर आदी गावांतील ग्रामस्थांनी कावड यात्रेचे पूजन, फुलांची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने भव्य स्वागत केले. दुपारी दोन वाजता यात्रेचा समारोप श्री क्षेत्र रामलिंग येथे झाला.

रामलिंग देवस्थान विश्वस्त मंडळाने यात्रेतील भाविकांसाठी विशेष अभिषेक व दर्शनाची सोय केली होती. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरूर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती.या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी टाकळी हाजीसह परिसरातील उद्योजक, ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. यात्रेचे नियोजन धर्म जागरण समितीचे माऊली घोडे व शिवबा संघटनेचे सोमनाथ भाकरे यांनी केले. रामलिंग गावचे विश्वस्त नामदेव घावटे व धर्म जागरण समितीचे सचिन तागड यांनी यात्रेत सहभागी सर्व तरुण भक्तांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

2 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

3 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

3 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

3 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

3 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

3 तास ago