मुख्य बातम्या

शिरूर -पाबळ रस्त्यावर धोकादायक खोदकाम; नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका

ठेकेदाराची हलगर्जी अधिकाऱ्यांची डोळेझाक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ-भीमाशंकर राज्यमार्ग क्र. १०३ वरील रामलिंग-तुकाई मळा ओढा परिसराजवळ, रस्त्याच्या कडेने केबल टाकण्याच्या कामासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला अत्यंत धोकादायक पद्धतीने मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. हे खोदकाम कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता पूर्णतः खुले सोडले असून, रात्रीच्या अंधारात हे खड्डे एखादे वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात, मोटारसायकल साठी तर हे अत्यंत धोकादायक आहे.

या ठिकाणी कोणतेही चेतावणी फलक, बॅरिकेड्स किंवा प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे हे ठिकाण अत्यंत धोकादायक बनले आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम उप विभाग, शिरूर यांच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जिवाला आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

सदर घटनेबाबत “सामाजिक कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर निलेश मंदा यशवंत वाळुंज” यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूरचे सहायक अभियंता अनिल जाधव यांना सदर घटनेची माहिती दिली असून, छायाचित्रे व व्हिडिओ पाठवून आपली तीव्र नाराजी नोंदवली आहे.

वाळुंज यांना सहायक अभियंता यांनी सांगितले की याबाबत मला कोणतीही कल्पना नाही, यावर वाळुंज यांनी सांगितले की नागरिकांमधून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारच्या दरम्यान शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहन महिंद्रा बोलेरो आणि अधिकारी गाडेकर हे संबंधित कामाच्या ठिकाणी दिसले होते आणि तेव्हा खोदकामही सुरू होते, यामुळे सदर काम जर कार्यालय प्रमुख यांना खरेच माहिती नसेल तर हे काम विना परवाना सुरू आहे? विभागातील इतर अधिकारी यांना माहिती असूनही येवढा दुर्लक्षितपणा. “सदर बाब सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनाही व्हॉट्सॲपद्वारे कळविण्यात आली आहे.”

सदर रस्ता तालुक्यातील एक प्रमुख राज्य मार्ग असून पुढे उरण पनवेल कडे जोडलेला असल्याने छोट्या व मोठ्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते ,जनतेच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या बेजबाबदार आणि निष्काळजी कामावर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार का? या प्रकरणी जनहित लक्षात घेऊन वरिष्ठ प्रशासन गांभीर्याने पावले उचलणार का? जनतेच्या जीवाला काही किंमत उरली नाही का? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे. लोकसेवकांनी स्वप्रेरणेनी कर्तव्यादक्ष राहणे गरजेचे असतानाही प्रत्येकवेळी जनतेनीच आवाज उठवला पाहिजे?

निलेश मंदा यशवंत वाळुंज

(सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

14 तास ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

16 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

18 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

20 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

20 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

21 तास ago