न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात गुरवार (दि 26) मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकान फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन येळे यांच्या कोकरे किराणा स्टोअर या दुकानाचे छतावरील पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि रोकड लंपास करून पसार झाला. संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटिव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूने छतावरील पत्रे काढून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड पेटीतील रक्कम चोरून तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सकाळी दुकान उघडताना हा प्रकार उघडकीस आला. छतावरील पत्रे विस्कटलेली आणि दुकानातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले.
दुकानात बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात चोरट्याची हालचाल स्पष्टपणे दिसत आहे. चेहरा आंशिक झाकलेला असला तरी त्याची अंगकाठी, हालचाली आणि कपडे यावरून ओळख पटविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन न्हावरे परिसरात यापुर्वीही लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी “रात्री गस्त वाढवावी, संशयितांवर कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह…?
मध्यरात्रीच्या सुमारास इतक्या शांतपणे छत फोडून चोरी होते आणि पोलिसांना खबरही लागत नाही, यावरुन पोलिस गस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा व्यापाऱ्यांचा संयम सुटू शकतो, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. न्हावरेकरांचे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…