न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात गुरवार (दि 26) मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकान फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन येळे यांच्या कोकरे किराणा स्टोअर या दुकानाचे छतावरील पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि रोकड लंपास करून पसार झाला. संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटिव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूने छतावरील पत्रे काढून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड पेटीतील रक्कम चोरून तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सकाळी दुकान उघडताना हा प्रकार उघडकीस आला. छतावरील पत्रे विस्कटलेली आणि दुकानातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले.
दुकानात बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात चोरट्याची हालचाल स्पष्टपणे दिसत आहे. चेहरा आंशिक झाकलेला असला तरी त्याची अंगकाठी, हालचाली आणि कपडे यावरून ओळख पटविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन न्हावरे परिसरात यापुर्वीही लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी “रात्री गस्त वाढवावी, संशयितांवर कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह…?
मध्यरात्रीच्या सुमारास इतक्या शांतपणे छत फोडून चोरी होते आणि पोलिसांना खबरही लागत नाही, यावरुन पोलिस गस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा व्यापाऱ्यांचा संयम सुटू शकतो, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. न्हावरेकरांचे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…