पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असून वाहनांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे.
याची तातडीने दखल घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने पाबळ–कन्हेरसर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी आणि खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…
शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…
अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…
1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…